श्री
नवरात्रात पुष्कळ लोक सप्तशती वाचतात.त्यात सुरवातीलाच कवच,अर्गला, कीलक, पाठ म्हणावा लागतो.कवच तर नावाप्रमाणे देवीचे कवच आहे.ज्याच्या नित्य पठणाने सर्व संकटातून आपली मुक्ती होईल असे आश्वासन त्यात आहे.त्यानंतर अर्गला म्हणजे कडी ,सप्तशतीच्या पठणाने अंगात दैवी सामर्थ्य संचारते,ह्या दैवी शक्तीचा कलियुगातल्या माणसांनी दुरुपयोग करू नये म्हणून ह्या श्लोकांना अर्गला म्हणजे कडी आणी कीलक म्हणजे कुलूप लावून बंदिस्त केले आहे.देवीच्या भक्तांना ह्याचा काहीच त्रास होत नाही.देवीची कृपा एवढीच त्यांची अपेक्षा असते,पण काही लोक एवढ्याने संतुष्ट होणारे नसतात त्यांना सिद्धी आणी प्रसिद्धी पण हव्या असतात .ह्यातले काही विशिष्ट श्लोक म्हणून हे कडी कुलूप उघडले जाते .अर्थात देवीच्या भक्तांना सप्तशती पाठाचे पूर्ण फळ मिळते.मग कशाला उगीच कडी कुलूप उघडून बघायचे?आपण नुसतीच प्रार्थना करू " रूपं देही जयं देही यशो देही द्विषो जहि " जगदंबेच्या चरणी हे पुष्प ! सौ.उषा.
No comments:
Post a Comment