श्री
शेवटी एकदाचे आम्ही त्या दिदिंकडे येऊन पोचलो.रिक्षावाल्याला मोठ्या अजीजीने थांबण्याबद्दल विनविले कारण वाटेत कुठेही मनुष्य वस्तीच्या खुणा दिसल्या नव्हत्या .आम्ही कुठल्यातरी अनोळखी ग्रहावर आलो आहे की काय असे वाटण्या इतपत भेसूर शांतता सगळीकडे पसरली होती.रिक्षावाला पुन्हा मानेनेच हो म्हणाला,आम्ही दीदींच्या घराची घंटा वाजविली.एक कुजबुज केल्या सारख्या आवाजात विचारणा झाली कौन है ? मी उषा उत्तर दिल्यावर थोड्यावेळ शांतता मग दीदींचा आवाज आला कौन है ? दीदी मैं उषा हुं.थोडा अविश्वास आणी पुष्कळ भीती असा त्यांचा चेहेरा किलकिल्या दारातून डोकावला,मला दारात बघून आश्चर्य आनंद यांनी त्यांचा चेहरा उजळून निघाला.आम्हाला आत घेऊन त्यांनी दार बंद करून घेतले.मला म्हणाल्या तुम सचमुच आवोगी ये मैने सोचा नाही था,पर उषा तुम याहांतक आई कैसे ?
सौ.उषा.
No comments:
Post a Comment