Saturday, 22 October 2011

                                श्री 
सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !उद्यापासून चार पाच दिवस तुम्ही कदाचित इतके busy व्हाल की माझ्या शुभेच्छा तुम्हाला दिवाळी नंतर मिळतील आणी मला तेच नको आहे.उद्या संध्याकाळी आपण अंगणात पहिली पणती लावणार ,छान रांगोळी काढणार,मस्त फराळाचे पदार्थ तयार करणार,नवे कपडे घालणार मुख्य म्हणजे उद्या गाय वासराची पूजा करून दिवाळीच्या सणाची सुरुवात करणार.दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आम्ही हिंदू निसर्गपूजक प्रकाश पूजक आहोत.माझ्या देशाचे नाव ह्याचे ध्योतक आहे .भारत, भा म्हणजे प्रकाश आणी रत म्हणजे रमणारा प्रकाशात रमणारा तो    भारत !ज्ञान विज्ञानाच्या प्रकाशाने जो सतत नूतन भासतो तो      भारत !ह्या देशावर निसर्ग बेहद्द खूष आहे.इथे पावसाळ्याचे काही ढगाळ दिवस सोडले तर बाराही महिने लक्ख सूर्यप्रकाश असतो त्यामुळे असेल कदाचित प्रकाशाचं इथल्या प्रत्येकाला नैसर्गिक आकर्षण आहे. उद्या वसुबारस आणी परवा धनत्रयोदशी ज्या दिवशी आपण दक्षिणेकडे तोंड करून पणती लावतो,भगवान धन्वंतरीची पूजा याच दिवशी करायची असते.गाय वासरू ,मग वनस्पती आहे न निसर्गाची पूजा .
                                                                 सौ.उषा.

No comments:

Post a Comment