श्री हिशोब आपण सगळेच कमी अधिक फरकात करत असतो .कधी पैशांचा कधी आणखी कसला पण हिशोब म्हंटल की आपल्याला पैशांची बेरीज वजाबाकी पटकन आठवते.हो दुसऱ्यांनी केलेल्या चुका, आपल्यावर इतरांनी केलेले अन्याय आपल्याला अगदी झोपेतून उठविले तरी बिनचूक आठवतात .हा हिशोब कसा अगदी काना मात्र फरक न होता आपण कधीही आठवू शकतो. आपल्याला आठवत नाही फक्त आपल्या चुका आपण दुखवलेली मन .या सगळ्यांचा हिशोब आपण ठेवायला शिकू तेव्हाच माणूस म्हणून एक पाऊल पुढे पडले असे म्हणता येईल.तेव्हाच आपण सुसंकृत होण्याच्या वाटेवर चालायला लागलो असे समाधान आपण मानू शकतो .
सौ.उषा