श्री रोजच काहीतरी लिहायचे म्हणजे काही गम्मत नाही.विषय कुठून आणणार पण आता एकदा ठरवलं आहे तर माघार घेणे शक्य नाही.समर्थ म्हणतात न दिसामाजी काहीतरी लिहीत जावे मग ते काहीही असेना का शिवाय माझ्या शिवाय वाचणार तरी कोण मग कसला आलाय संकोच स्वतःच स्वताशी बोलायचं मनात खोलवर दडून बसलेया कितीतरी गोष्टी आपोआपच बाहेर येतील आणी मन होईल निर्मळ ताजं.अस निर्मळ मन असत फक्त लहान मुलांच.देवाजवळ जाण्याकरता असच सुमन हवं न जे देवाला अर्पण करायला जराही संकोच वाटणार नाही. सौ.उषा