Monday, 26 September 2011

 सुधारणा  करायची म्हंटल म्हणजे आपल्याला दुसऱ्या माणसांनी काय काय सुधारणा करायला हव्या ते पटकन आठवतं.आपण सुचवलेल्या सुधारणा त्यांना कितपत मान्य आहेत ह्याच्याशी आपल्याला काहीही देणघेण नसतं.पण खर सांगू दुसऱ्याला सुधारण्याच्या फंदात आपण न पडलेलं बर.स्वताला सुधारणे , स्वतः मध्ये अनुकूल बदल घडवून आणणे हे कितीतरी पटींनी सोपे आणी जास्त फायदेशीर आहे.आपल्यातले चांगले बदल आपल्या व्यक्तीमत्वाला एक वेगळीच उंची प्राप्त करून देतात .हे बदल कायमस्वरूपी आनंददायक ,इतरांना प्रेरणा देणारे ठरतात पण आपण आपला बहुमोल वेळ इतरांना सुधारण्याच्या फोल प्रयत्नात घालवतो.देवानी दिलेलं आयुष्य सत्कारणी लावणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.ह्या आयुष्याचा जास्तीत जास्त भाग सगळ्यांच्या उपयोगी कसा पडेल हे ठरवणे आपल्याच हातात आहे.परमेश्वरानी आपल्या सगळ्यांनाच ही बुद्धी दिलेली आहे.  . . . . . . .. .    . .                                                                                                                                                                                                                                    सौ.उषा .