Tuesday, 25 October 2011
आली दिवाळी
श्री
दिवाळीचा उत्साह आता हळू हळू वाढत जाणार.मराठी माणसांच्या दिवाळीचे एक अविभाज्य अंग म्हणजे दिवाळी अंक ,लक्ष्मीपूजन करताना सरस्वतीचे स्मरण आवर्जून ठेवणे ह्यालाच म्हणतात संस्कृती !फराळ फटाके,नवीन कपडे ,दागिने सगळ्यांची नवलाई वापरल्यावर कमी कमी होत जाते,एका माणसाने वापरले की कपडे दागिने दुसऱ्याला वापरायची इच्छा होत नाही, पण पुस्तकांचे असे नसते एकानंतर दुसरा असे आपण सगळेच त्यांचा आनंद घेऊ शकतो.एकाने वाचायचे आणी बाकीच्यांनी ऐकायचे या पद्धतीनेतर कित्येक लोक एकाच वेळेस पुस्तकाचा आनंद घेऊ शकतात.सकस अन्नाने जसे शरीराचे पोषण उत्तम प्रकारे होते तसेच सकस साहित्याने आपल्या मन, बुद्धीचे उत्कृष्ट पोषण होते.असा सरस्वतीपुत्र जीवनात हरघडी येणाऱ्या नानाविध समस्यांना यशस्वीपणे सामोरे जातो.आपल्या घरातील मुलांना लहानपणापासूनच अश्या प्रकारे सरस्वतीपूजनाची सवय लावा लक्ष्मी आपोआपच येईल.सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !
सौ.उषा.
Subscribe to:
Posts (Atom)