श्री आज एक सुंदर प्रवचन ऐकायला मिळालं.देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या हा ज्ञानेश्वर माउलीचा हरी पाठातला पहिलाच अभंग .आता आपल्याला काय वाटतं की देवाचे दार म्हणजे देऊळाचे दार पण याचा अर्थ तसा नाईये म्हणे.देवाच दार म्हणजे त्याच नामस्मरण .त्याच नाम घेऊन आपण हळू हळू आपली योग्यता वाढवीत न्यायची इतकी की साक्षात चतुर्भुज नारायण आपल्या समोर उभा राहिला पाहिजे. आणी मग चारी मुक्ती आपल्या समोर हात जोडून उभ्या राहतील असं पुढे माउली आपल्याला आश्वासन देते आहे.आज इतकच. सौ.उषा.