श्री
आम्हां भारतीय माणसांना मोक्ष मुक्ती ह्या शब्दांचे किती आकर्षण आहे हे फक्त भारतीय माणूसच समजू शकेल.हा मोक्ष किंवा ही मुक्ती मिळावी म्हणून आम्ही आजन्म काही न काही प्रयत्न करत असतो.देवभोळी माणसं वेगवेगळ्या देवांची व्रतं करतात आणी स्वतास नास्तिक म्हणवून घेणारे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना हर तऱ्हेची मदत करण्याचा पर्याय निवडतात.ह्या मोक्ष शब्दाने आम्हाला इतकी भुरळ घातली आहे की आम्ही आपल्या दिवंगत आप्तेष्टाना मृत्यू नंतर उत्तम गती मिळावी म्हणून त्यांच्या तिथीला नेमाने श्राद्ध करतो.ज्यांना तिथी माहीत नाही ,लक्षात नाही त्यांनी आजच्या दिवशी म्हणजे पितृमोक्ष अमावास्येच्या दिवशी श्राद्ध करावे.ह्या निमित्ताने आपल्या पूर्वजांचे त्यांच्या उत्तम कार्याचे स्मरण होत असेल तर हे खूपच छान आहे.पण जिवंत आप्तेष्टांशी चांगले वागावे किबहुना सगळ्यांशी चांगले वागावे हे कसे आपल्या हातात आहे.आपले सत्कर्मच आपल्याला मोक्ष मिळवून देईल असे मला वाटते.
सौ.उषा