Tuesday, 4 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री आपल्याला आपल्या आयुष्यात रोज फक्त आणि फक्त सुख आनंद यश क...

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री आपल्याला आपल्या आयुष्यात रोज फक्त आणि फक्त सुख आनंद यश क...
                                                                              श्री
आपल्याला आपल्या आयुष्यात रोज फक्त आणि फक्त सुख आनंद यश कीर्ती हेच हवं असतं.अपरिहार्यपणे येणाऱ्या दुक्खाची अपयशाची चिंतेची भीतीची आपण काहीच मानसिक तयारी केलेली नसते.आपल्या भोवतालची अनेक माणसं मरताना आपण बघतो पण आपण आपल्या मृत्यूबद्दल विचार करायचं सुद्धा टाळतो.ह्याचाच आज आपण विचार करू या.देवांवर संकट आलं अमृत पिऊनहि अमर न झालेल्या देवांची दया येऊन जगदंबेनी असुरांना मारण्याकरता अत्यंत उग्र रूप धारण केलं काळा रंग अंगावर व्याघ्रचर्म संतापाने लाल झालेले डोळे आणी राक्षसांच रक्त पिण्याकरता आसुसलेली लाल जीभ!एखादा भित्रा जीव तर नुस्त वर्णन ऐकूनच बेशुद्ध व्हायचा.पण ज्याला जी भाषा कळते त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं हा संदेश ही महाकाली देते आहे.उगीचच अहिंसा सत्य अशी पोपटपंची नको.ही शूरांची शस्त्र आहेत आणी त्यांनाच ती शोभून दिसतात .येणाऱ्या संकटांना भिऊन पळ काढण्यापेक्षा त्यांचा सामना करा असं ही देवी आम्हाला सांगते आहे.त्या असुरांना भीती उत्पन्न करणाऱ्या महाकालीच्या चरणी माझे हे पुष्प.
                                                                                                                                                   सौ.उषा.