श्री पहाटे न उठणाऱ्या किंवा न उठू शकणाऱ्या माणसांची मला नेहेमीच खूप दया येते.आयुष्यातल्या किती मोठ्या आनंदाला ते मुकतात हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल या कल्पनेनी मलाच खूप वाईट वाटत.लालबुंद सूर्याचा गोळा हळू हळू वर येताना बघण्यात जे काय थ्रिल आहे ते स्वतःच अनुभवलेलं बरं.चिऊ चा चिवचिवाट ऐकण्या करता,थंडगार वाऱ्याची झुळूक अनुभवण्या करता आणी तब्बेत चांगली ठेवण्याकरता तरी पहाटे उठा.या पहाटेशी माझं नात फार जुनं आहे अगदी माझ्या जन्मापासून.पहाटे जन्म म्हणून तर उषा नाव ठेवलं न माझं .आजीचं गोड गाणं,गायींच्या गळ्यातल्या घुंगरांचे आवाज, काढल्या जाणाऱ्या दुधाच्या धारेचा आवाज ,ते दुधाचं फेसाळलेल पातेलं,त्याचा तो सुगंध सगळ कसं अगदी आनंद आनंद देणारं. सौ.उषा
No comments:
Post a Comment