Monday, 31 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री 3 राजेश्वरीचे सुस्पष्ट निर्भीड बो...
                                                  श्री                                                3
राजेश्वरीचे सुस्पष्ट निर्भीड बोलणे या राजवाड्याला थोडे नवीन होते.राजघराण्यातल्या लोकांनी बोलायचे अन बाकीच्यांनी निमुटपणे ऐकायचे ही वर्षानुवर्षाची परंपरा आज पहिल्यांदाच मोडली होती.महाराजांना तर मुळीच आवडले नव्हते.राजेश्वरीने लगेचच राजांना खुलासा केला,महाराज आम्ही हातावर पोट असलेली गरीब माणसं आहोत थोडे दिवस राजमहालात राहून,तिथले सुग्रास अन्न खाऊन आम्हाला आमच्या सवयी बदलणे फारसे परवडणारे नाही.कृपा करून माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नये.माझ्या वडिलां बरोबर राहणे मला भाग आहे.कारण त्यांचे काम झाल्यावर ते इतके थकून जातात की त्यांना स्वतःचे जेवण स्वतः बनवणे शक्य होत नाही.आता खूप चालून आल्यामुळे माझे वडील थकले आहेत त्यांची तब्बेत पण तितकीशी बरी नाही पण आपणास दिलेला शब्द मोडायचा नाही म्हणून ते इथवर आले.गेले दोन दिवस आम्हाला काही खायला पण मिळाले नाही त्यामुळे त्यांना धड बोलताही येत नाही म्हणून मला इतकं बोलाव लागलं,काही चुकलं असेल तर क्षमा करा.आता महाराजांना वेगळ्याच काळजीने घेरले,आपण उगीच या माणसाच्या नादी लागलो .ह्याला एवढे मोठे काम पेलणे शक्यच नाही.अठरा लहान मोठ्या खोल्यांच्या राजवाड्याला हा कसं रंगविणार चित्र काढणं फार लांबची गोष्ट आहे.नाही याला परत पाठवावं हेच बरं!इतक्यात रघुनाथ उभा राह्यला अन म्हणाला महाराज आज मुहूर्ताचा दिवस आहे न मग कुठून सुरवात करू ते सांगा मी थोडं सामान बरोबर आणले आहे.
                                                         सौ.उषा.
                                                             

Sunday, 30 October 2011

USHA: USHA: USHA:  आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकड...

USHA: USHA: USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकड...: USHA: USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्... : USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच ना... : आज भाऊबीज बहि...
                                    श्री                                       2   
महाराज सुदर्शन रघुनाथच्या भेटीची वाट पहात होते कारण आज रंगकामाला चांगला दिवस असल्याचे त्यांच्या राजगुरूंनी सांगितले होते.आज मुहूर्त जरी झाला तरी चालणार होते.दुपारी दोनच्या सुमारास रघुनाथ सुंदरपुरात दाखल झाल्याचे त्यांना कळले.स्नान वगैरे आटपून रघुनाथ महाराजांच्या भेटीला हजर झाला.सुदर्शन महाराज रघुनाथला बघून थोडेसे खट्टू झाले होते कारण रघुनाथचे उतरलेले खांदे जास्त वाईट दिसतात की त्याच्या चेहेऱ्यावरचे निर्विकार भाव जास्त अस्वस्थ करतात ह्याचा विचार करायला पण त्यांना त्रास होत होता त्यात भरीस भर म्हणून रघुनाथच्या बरोबर एक २० २२ वर्षाची मुलगी पण होती आणी तिला आणायची परवानगी पण रघुनाथने घेतली नव्हती.त्याच्या एकूण व्यक्तिमत्वा बद्दलच महाराजांना शंका वाटू लागली होती,पण शंका घ्यायला वाव पण नव्हता कारण रघुनाथ त्यांच्या परम मित्राने पाठविलेला माणूस होता.शेवटी महाराजांनी रघुनाथला काही गोष्टी  खडसावून सांगायचा,विचारायचा निश्चय केला.महाराज म्हणाले की रघुनाथचे सुंदरपुरात स्वागत आहे पण त्यांच्या बरोबर आलेल्या मुलीला इथे राहू दिले जाणार नाही,एकतर तिच्याबद्दल कुठलीच पूर्व परवानगी न घेता तिला इथे आणले गेले.आणी दुसरे म्हणजे बरोबर कुणी नातेवाईक आहे म्हटल्यावर त्यांच्यात गुंतून कामात चालढकल होणे महाराजांना मुळीच चालणार नव्हते.रघुनाथने महाराजांचे सगळे बोलणे शांतपणे ऐकून घेतले अन मग तो निर्णायक बोलल्याप्रमाणे म्हणाला "महाराजांचे चरणी माझा दंडवत!ही माझी एकुलती एक मुलगी राजेश्वरी आम्हा दोघांना एकमेकांशिवाय कुणीही नाही,शिवाय ही माझ्या जेवण्या खाण्याचे पण बघते".आता मात्र महाराजांना हसूच आले भोवतीचे सेवक पण हसू लागले.महाराज म्हणाले "रघुनाथ राजवाड्यात रोज कित्येक लोकांचा स्वैपाक होतो त्यात एकट्या रघुनाथच्या जेवण्याची नक्की सोय होईल,फक्त खाण्याचीच नाही तर राहण्याची सुद्धा सोय केली जाईल."रघुनाथने जोरात मान हलवून नकार दिला त्याला खोकल्याची उबळ आली होती.एवढ्यावेळ पुतळ्या सारखी उभी असलेली राजेश्वरी झटकन पुढे झाली,तिने वडलांना कसलेसे औषध दिले थोड्या वेळाने रघुनाथ स्वस्थ झाला असे बघून,राजेश्वरीने महाराजांना नमस्कार केला आणी म्हणाली "महाराज आपण फक्त माझ्या वडलांची राजवाड्याबाहेर कुठेतरी राहायची सोय करा आणी त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून थोडा शिधा ध्यावा जेणेकरून मी त्यांना स्वैपाक करून जेवू घालू शकेन.माझ्या जेवणाची सोय देव नक्कीच करेल !
                                 सौ.उषा.
                                  

Saturday, 29 October 2011

USHA: USHA:  आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्...

USHA: USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्...: USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच ना... : आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच नात्यांना एक वेगळाच गोडवा आह...
                                                श्री                                                    1
दिवाळीची गडबड संपली अन वातावरणात एक प्रकारचा शिथिलपणा आला
  उरलेला फराळ अन फटाके संपविले जातील म्हणा.आपण सगळ्यांनीच खूप आनंद घेतला दिवाळीच्या दिवसांचा हा आनंद पुढे वृद्धिंगत करण्याकरता मी आजपासून तुमच्या करता एक नवीन आनंद घेऊन आले आहे.आपणा सगळ्यांना लहानपणापासून ऐकायला आवडते ती गोष्ट खूप दिवस पुरेल अशी  कथा मी आजपासून तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे.कथा अर्थातच काल्पनिक आहे.असं म्हणतात की सत्याला मर्यादा असतात पण कल्पनेला कुठलेच बंधन नसल्याने ती अमर्याद धावू शकते.आणी निखळ मनोरंजन हाच हेतू असला तर मग थांबायचं कश्याला ?
                                               ही कथा आहे १९४७ च्या थोड्या आधी घडलेली.सुदूर एका खोल दरीत महाराज सुदर्शन आणी देवी सुलक्षणा यांचे सुंदरपूर नावाचे राज्य होते.त्यांचे सुपुत्र सुजय उच्च शिक्षण घेण्याकरता लंडनला गेले होते.त्या वेळच्या प्रथेप्रमाणे युवराज सुजयचा विवाह लहानपणीच दिवापुरचे महाराज भरतसिंग यांची लाडकी मुलगी सुकन्याशी झाला होता.सुकन्या अत्यंत रूपवान होती पण ?जाऊ दे राजवाड्यात सुद्धा या विषयी कोणी फारसं बोलत नसे.सुजय आणी सुकन्या यांची कन्या राजकुमारी सुवर्णरेखा पण आपल्या आई प्रमाणेच अत्यंत रूपवती होती.अवघ्या आठ वर्षाची सुवर्णरेखा आक्रस्ताळेपणा करून सगळा राजवाडा हलवून सोडायची .लहान असल्यामुळे सगळेच सहन करायचे.                                                                                             भारताला स्वतंत्र करण्याकरता देशाच्या कानाकोपऱ्यात जोरदार हालचाली सुरु होत्या,अर्थात सुंदरपूर सारख्या अडनिड ठिकाणी या विषयी फारशी माहिती नसणं स्वाभाविकच होतं त्यांना वेगळ्याच गोष्टीची उत्सुकता होती ती म्हणजे राजे सुजय केव्हा परत येणार !राजे येणार असल्याची कुजबुज सगळ्या सुंदरपुरात एव्हाना पसरली होती आणी त्याला कारण होतं राजवाड्याच्या रंगकामात रघुनाथ नावाच्या एका परगावच्या चित्रकाराची घेतलेली मदत!
                           रघुनाथ विषयी कोणालाच काही माहित नव्हतं.महाराज सुदर्शन यांचे मित्राने त्याचे नाव सुचविले होते.
                                                             सौ.उषा.              
      

Friday, 28 October 2011

USHA:  आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच ना...

USHA: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच ना...: आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच नात्यांना एक वेगळाच गोडवा आहे,मान आहे,हळुवार जपणूक आहे.आपण कोरडे दिवस सेलिब्रेट करत नाही....
 
आज भाऊबीज बहिण भावाचा दिवस ! आपल्याकडे सगळ्याच नात्यांना एक वेगळाच गोडवा आहे,मान आहे,हळुवार जपणूक आहे.आपण कोरडे दिवस सेलिब्रेट करत नाही.आई वडील वृद्धाश्रमात आणी मुलं mothers day fathers day सेलिब्रेट करताहेत अस नाही.बहीण भावाच्या अनेक सुंदर कथा आमच्या चित्रपटातून आलेल्या आहेत.कृष्ण द्रौपदी ही जोडी तर आपल्या सगळ्यांची आवडती आहे.श्यामची आई या चित्रपटात एक सुंदर गीत होत "भरजरी  ग पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण "बहिणीने भावाच्या दीर्घायुष्या बद्दल देवाजवळ प्रार्थना करावी,त्याला गोड धोड खाऊ घालावे आणी भावाने संकट समयी तिचे रक्षण करावे असा मोठा गोड करार आहे.ज्या मुलीला भाऊ नाही तिची पण आमच्या पूर्वजांनी सोय केली आहे ,चंद्राला ओवाळले की झाली भाऊबीज साजरी !पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
                                                                                     सौ.उषा.

Bhai Behan Ka Pyaar To My Sisters

Thursday, 27 October 2011

USHA: USHA:                                          श्र...

USHA: USHA: श्र...: USHA: श्री आज प... : श्री आज पाडवा साडेतीन मुहूर्तापैक...

Lakshmi Narayan

Lakshmi Narayan by simon_ram
Lakshmi Narayan, a photo by simon_ram on Flickr.

USHA:                                          श्री आज प...

USHA: श्री आज प...: श्री आज पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक!आजच्या दिवसाला बलिप्रतिपदा असेही म्हणतात.राक्षसांचा राज...
                                         श्री 
आज पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक!आजच्या दिवसाला बलिप्रतिपदा असेही म्हणतात.राक्षसांचा राजा बली हा मोठा भगवतभक्त होता त्याने केलेल्या यज्ञाच्या समाप्तीला साक्षात भगवान विष्णू छोट्या बटूच्या रुपात दक्षिणा मागायला आले,राजानी त्यांना नमस्कार करून काय हवी ती दक्षिणा मागायला सांगितली,वामन अवतारात आलेल्या विष्णूला ओळखायला दैत्यगुरू शुक्राचार्यांना अजिबात वेळ लागला नाही त्यांनी बलीराजाला सावध केले पण राजा शब्दाचा पक्का होता,त्याने माघार घ्यायला नकार दिला,साक्षात विष्णू भिक्षा मागायला आल्यावर ती न देण्याचा करंटेपणा करणं बळीराजासारख्या दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजाला शक्यच नव्हतं.तीन पाऊल जमीन दक्षिणा बटूने मागितली.वामनाने एका पावलाने पृथ्वी,दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला,तिसरे पाऊल कुठे ठेवू विचारल्यावर बळीराजाने विनम्रपणे नमस्कार करून आपले मस्तक पुढे केले,त्यावर पाऊल ठेऊन वामनाने त्याला थेट पाताळात ढकलले,त्याच्या दानशूर पणावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला वर मागायला सांगितला तर बळीराजा म्हणाला की माझ्या दारावर तुम्ही सतत उभे रहा.भगवान विष्णू आता वैकुंठ सोडून बळीराजाच्या दरवाजावर पहारेकरी म्हणून उभे झाले.वैकुंठात लक्ष्मीदेवी अत्यंत दुखी झाली पण ती लगेचच निघाली जिथे नारायण तिथे लक्ष्मी !दारी चालून आलेल्या लक्ष्मीचे बळीने मनोभावे स्वागत केले तिला बहिणीचा मान देऊ केला.हीच संधी साधून लक्ष्मीने आपले पती म्हणजे नारायण जे दारावर उभे होते त्यांच्या सुटकेची विनवणी केली,उदार बळीराजाने मोठ्या मनाने वामनाची सुटका केली.लक्ष्मी नारायण प्रसन्न झाले आणी त्यांनी बळीला आशीर्वाद दिला.जगाचे पालन पोषण करणाऱ्या लक्ष्मी नारायणाला निव्वळ भक्तीने आपल्या अंकित करून घेणाऱ्या बळीराजाचे स्मृती प्रीत्यर्थ आज बली प्रतिपदा! पाडवा!लक्ष्मी नारायण आपल्या सगळ्यांना प्रसन्न व्हावे हीच शुभेच्छा !लक्ष दिव्यांच्या ज्योतीने आपल्या आयुष्यात सुख सौभाग्याचा आरोग्याचा प्रकाश पसरावा ही शुभेच्छा व्यक्त करून मी आज इथेच थांबते.
                                                         सौ.उषा.

Lakshmi Narayan

Lakshmi Narayan by simon_ram
Lakshmi Narayan, a photo by simon_ram on Flickr.

Wednesday, 26 October 2011

USHA: USHA:                                             ...

USHA: USHA: ...: USHA: ... : श्री ...

USHA:                                       श्री पहाटेच्...

USHA: श्री पहाटेच्...: श्री पहाटेच्या या समयी म्हणा हरी हरी !भगवान गोपालकृष्णाच्या स्मरणाने आज दिवाळीतला एक महत्वाचा दिव...
                                      श्री 
पहाटेच्या या समयी म्हणा हरी हरी !भगवान गोपालकृष्णाच्या स्मरणाने आज दिवाळीतला एक महत्वाचा दिवस उगवला.नरकासुराच्या बंदिवासातून सोळा हजार राजकन्यांची कृष्णाने मुक्तता केली आणी त्यांच्याशी विवाह करून त्यांना समाजात एक प्रतिष्ठित स्थान मिळवून दिले तो हा नर्क चतुर्दशीचा दिवस !  आजच संध्याकाळी अमावस्या लागणार असल्याने लक्ष्मी पूजन पण आहे. अगदी लहान वयापासून आपण  मनापासून पूजा करतो ती  ही लक्ष्मीदेवी! पावलागणिक जिच्यावाचून आमचं अडतं ती ही लक्ष्मी !हिची स्तुती करताना एका स्तोत्रात म्हटलं आहे लाक्ष्मिमुळेच तुमच्या रूप,गुण ,कुल नव्हे एकूण तुमच्या अस्तित्वालाच हिच्यामुळे शोभा येते !तर अशी ही लक्ष्मी सन्मार्गाने धन कमविणाऱ्याकडे नारायणासहित गरुडावर बसून येते आणी सर्व प्रकारच्या सुख समृद्धीचा वर्षाव करते.अधर्माने धन कमविणाऱ्याकडे हीच लक्ष्मी घुबडावर बसून येते आणी त्या घरात मग शांतीचा,सुखाचा मागमूस उरत नाही.लक्ष्मीची खूप छान छान स्तोत्र आहेत पण सर्वाधिक प्रचलित श्रीसूक्ताने देवीला अभिषेक करण्याचाही प्रघात आहे.पूज्य डोंगरे महाराज म्हणायचे की लक्ष्मी माता है उसका उपयोग तो किया जा सकता है उपभोग नही!केवळ लक्ष्मीचे आणी गणेशाचे पूजन करण्यापेक्षा आधी गणेश पूजन करून मग नारायणासहित लक्ष्मीचे पूजन हे जास्त शास्त्र शुद्ध आहे.शंकराचार्य एकदा एका घरी भिक्षा मागायला गेले ,घरातल्या गृहिणीने मोठ्या दुक्खी अंतःकरणाने घरात असलेला एक आवळा त्यांना भिक्षा म्हणून दिला घरात बाकी काहीच नसल्याचे तिचे दुक्ख शिव अवतार शंकराचार्यानी ओळखले, तिचे उदार मन बघून त्यांनी तिथल्या तिथे एका अद्भुत स्तोत्राची रचना करून देवी लक्ष्मीची आळवणी केली आणी त्या घरात सुवर्णाची बरसात झाली.ते कनकधारा स्तोत्र म्हणून आपणपण देवीला म्हणूया "नमोस्तु हेमामबुजपिठीकाये     नमोस्तु भूमंडलनायीकाये,नमोस्तु देवादिदयापराये,नमोस्तु   शार्न्गयुध वल्लभाये" सर्वांना आरोग्य सुख समृद्धी श्री लक्ष्मी नारायणाचे कृपेने लाभो ही त्यांचे चरणी विनम्र प्रार्थना!
                                                  सौ.उषा.

Tuesday, 25 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री दिवाळीचा उत्साह आता हळू हळू वाढत जाणार.मराठी माणसांच्या द...

आली दिवाळी

                                                                         श्री 
दिवाळीचा उत्साह आता हळू हळू वाढत जाणार.मराठी माणसांच्या दिवाळीचे एक अविभाज्य अंग म्हणजे दिवाळी अंक ,लक्ष्मीपूजन करताना सरस्वतीचे स्मरण आवर्जून ठेवणे ह्यालाच म्हणतात संस्कृती !फराळ फटाके,नवीन कपडे ,दागिने सगळ्यांची नवलाई वापरल्यावर कमी कमी होत जाते,एका माणसाने वापरले की कपडे दागिने दुसऱ्याला वापरायची इच्छा होत नाही, पण पुस्तकांचे असे नसते एकानंतर दुसरा असे आपण सगळेच त्यांचा आनंद घेऊ शकतो.एकाने वाचायचे आणी बाकीच्यांनी ऐकायचे या पद्धतीनेतर कित्येक लोक एकाच वेळेस पुस्तकाचा आनंद घेऊ शकतात.सकस अन्नाने जसे शरीराचे पोषण उत्तम प्रकारे होते तसेच सकस साहित्याने आपल्या मन, बुद्धीचे उत्कृष्ट पोषण होते.असा सरस्वतीपुत्र जीवनात हरघडी येणाऱ्या नानाविध समस्यांना यशस्वीपणे सामोरे जातो.आपल्या घरातील मुलांना लहानपणापासूनच अश्या प्रकारे सरस्वतीपूजनाची सवय लावा लक्ष्मी आपोआपच येईल.सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !
                                                                                         सौ.उषा.

Monday, 24 October 2011

USHA: USHA:                                             ...

USHA: USHA: ...: USHA: ... : श्री दिवा...
                                                                          श्री 
खूप वर्षापूर्वी दिवाळीच्या थोड्या आधी मी आमच्या नवीन शेजाऱ्यांना सांगितलं की तुमचं घराचं काम दिवाळीत कृपा करून बंद ठेवा तर त्यांनी ताबडतोब मान हलवून रुकार दिला मला हायसं वाटलं कारण गेले कित्येक दिवस त्यांच्या घराच्या बांधकामामुळे आमच्या अंगणात केव्हा काय येऊन पडेल याचा काही नेम नव्हता.नर्क चतुर्दशीच्या दिवशी सकाळी  मी आणी माझ्या मुलीनी म्हणजे कल्याणीनी अंगणात सव्वीस थेम्बी सव्वीस ओळी अशी भली मोठी रांगोळी काढली रंग भरले तृप्त नजरेनी आपली रांगोळी न्याहाळली आणी दुसऱ्या कामाला वळलो.साधारण दहाच्या सुमारास बेल वाजली म्हणून दार उघडायला गेले आणी समोरचे दृश बघून रागवू नाही म्हटल तरी खूप राग आला आमच्या रांगोळीवर सिमेंट रेती विटांचे तुकडे ह्यांचा खच पडला होता.एक वेगळीच रांगोळी ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आमच्या पुढे साकारली होती.थोड्याच वेळात आमचे ते शेजारी आले अन मी त्यांना रांगोळी दाखवून रागानेच विचारले आपको बताया था फिरभी आपने हमारी रांगोली मिटाने मे कोई कसर नहि छोडी त्यावर ते निरागसपणे म्हणाले आपने तो दिवाली के दिन के बारे मे बोला था और मुझे याद भी है ,हम भी तो हिंदू हैं लक्ष्मी पूजा कल है भाभी !झालं एव्हढ म्हणून ते निघून गेले,मी कपाळावर हात मारून घेतला अन मग विचार करू लागले तो लक्षात आले की साग्र संगीत दिवाळी फक्त आम्ही मराठी माणसच साजरी करतो,बाकी सगळ्यांना दिवाळी म्हणजे लक्ष्मी पूजनच अभिप्रेत असतं ! असो ,आज भगवान धन्वंतरी समुद्र मंथनातून अवतरले तो सुदिन .जगातील पहिला डॉक्टर हातात शंख चक्र अमृतकलश आणी जालोका घेऊन अवतरला कुठल्याही काळात सहज उपलब्ध हानिरहित औषधाचा अमृत साठा घेऊन धन्वंतरी आले आणी त्यांचे एकापेक्षा एक वरचढ शिष्य ह्यांनी सगळ्या जगाला निरोगी जीवनाच्या सोप्या युक्त्या सांगितल्या म्हणून आपण आजच्या दिवशी त्यांचे विशेष स्मरण करतो.काही लोक आज पण लक्ष्मी पूजा करतात .घरात समृद्धी रहावी म्हणून एखादी वस्तू आजच्या दिवशी विकत घेण्याचा पण प्रघात आहे.पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 
                                                               सौ.उषा.
                                                  

Sunday, 23 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री दिवाळीच्या शुभेच्छा मी रोजच दिवाळी संपेपर्यंत देणार कारण प्रत्य...

USHA:                                 श्री सर्वप्रथम सगळ...

USHA: श्री सर्वप्रथम सगळ...: श्री सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !उद्यापासून चार पाच दिवस तुम्ही कदाचित इतके busy व...
                                                                  श्री 
दिवाळीच्या शुभेच्छा मी रोजच दिवाळी संपेपर्यंत  देणार कारण प्रत्येक व्यक्ती वेग वेगळ्या वेळेस माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करेल ह्याची मला जाणीव आहे.सगळ्यांच्या आरोग्याची,बुद्धीची,धनाची,कल्याणाची आणी रक्षणाची प्रार्थना केल्यावर मन कसं प्रसन्न होऊन जातं.आपण जे दुसऱ्याला देतो ते सव्याज आपल्याला परत मिळतं हा निसर्ग नियमच आहे. आपलं लहानसं जीवन आनंदाने भरून जावे असे वाटत असेल तर सर्वांच्या उत्कर्षाची अभिलाषा धरा.फक्त स्वतः पुरतं मागण्याचा हव्यास देवाला पण रुचत नाही.अश्या प्रार्थनांचा तो अजिबात स्वीकार करत नाही.निसर्ग आम्हाला सदैव उत्तुंग स्वप्न पाहायला शिकवतो .समुद्र,डोंगररांगा,हिरवळ,नद्या कोणीच कोतेपणा शिकवत नाही.आपल्याजवळ असलेलं भरभरून वाटणं हा ह्यांचा सहज स्वभाव हातचं राखून कोणीच देत नाही,मग ह्या निसर्गाचा एक भाग असलेला माणूस तेवढा कोता का वागतो ? पण दिवाळी सारखा सण आला की सगळ्यांनाच उत्साह येतो.सगळे एकमेकांना खूप शुभेच्छा देतात त्यामुळे सगळ्या वातावरणात आनंदलहरी पसरतात आणी म्हणूनच आपणा सगळ्यांना हा सण मनापासून आवडतो .
                                                             सौ.उषा.

Saturday, 22 October 2011

USHA:                                 श्री सर्वप्रथम सगळ...

USHA: श्री सर्वप्रथम सगळ...: श्री सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !उद्यापासून चार पाच दिवस तुम्ही कदाचित इतके busy व...
                                श्री 
सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !उद्यापासून चार पाच दिवस तुम्ही कदाचित इतके busy व्हाल की माझ्या शुभेच्छा तुम्हाला दिवाळी नंतर मिळतील आणी मला तेच नको आहे.उद्या संध्याकाळी आपण अंगणात पहिली पणती लावणार ,छान रांगोळी काढणार,मस्त फराळाचे पदार्थ तयार करणार,नवे कपडे घालणार मुख्य म्हणजे उद्या गाय वासराची पूजा करून दिवाळीच्या सणाची सुरुवात करणार.दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव आम्ही हिंदू निसर्गपूजक प्रकाश पूजक आहोत.माझ्या देशाचे नाव ह्याचे ध्योतक आहे .भारत, भा म्हणजे प्रकाश आणी रत म्हणजे रमणारा प्रकाशात रमणारा तो    भारत !ज्ञान विज्ञानाच्या प्रकाशाने जो सतत नूतन भासतो तो      भारत !ह्या देशावर निसर्ग बेहद्द खूष आहे.इथे पावसाळ्याचे काही ढगाळ दिवस सोडले तर बाराही महिने लक्ख सूर्यप्रकाश असतो त्यामुळे असेल कदाचित प्रकाशाचं इथल्या प्रत्येकाला नैसर्गिक आकर्षण आहे. उद्या वसुबारस आणी परवा धनत्रयोदशी ज्या दिवशी आपण दक्षिणेकडे तोंड करून पणती लावतो,भगवान धन्वंतरीची पूजा याच दिवशी करायची असते.गाय वासरू ,मग वनस्पती आहे न निसर्गाची पूजा .
                                                                 सौ.उषा.

Thursday, 20 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री दीदींच्या प्रश्नाला मी जे उत्तर दिले की आम्ही रिक्षाने आलो त्या...
                                                                   श्री 
दीदींच्या प्रश्नाला मी जे उत्तर दिले की आम्ही रिक्षाने आलो त्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवली म्हणाल्या " उषा तुम्हे शायद taxi कहना है" त्यावर मी त्यांचा हात धरून त्यांना खिडकी जवळ नेले व झाडाखाली उभा असलेला रिक्षा दाखवला त्या एवढच म्हणाल्या तुम सचमुच बहोत थक गई हो आओ खा पीकर सो जावो कल सबेरे बात करेंगे.मी आता मात्र खूप जोरात मान हलवून त्यांना सांगितलं की मी निव्वळ नाईलाज म्हणून आले आहे,कृपा करून माझं नागपूरच परतीच ticket  द्या अन मी ताबडतोब इथून जाते.त्यानी दिलेलं सरबत फक्त  आम्ही घेतलं काहीही खाण्याची इच्छाच उरली नव्हती.आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.दिदींनी खिडकीतून हात हलवून आम्हाला निरोप दिला त्याची मला गंमतच वाटत होती.पुन्हा तीच उसाची शेतं,तोच घुंगरांचा आवाज,तेच सुंदर तरीही भीतीदायक चांदणं,आणी तीच विचित्र शांतता !रिक्षा वाला बहुदा मुका असावा कारण तो एकही शब्द बोलत नव्हता आमच्या कुठल्याच प्रश्नाचं त्याने काहीही उत्तर दिले नव्हते,अर्थात आम्हाला त्याच्या मूक बधीर असण्यापेक्षा इथून सही सलामत घरी जाण्याच्या काळजीने जास्त घेरले होते.आम्ही त्या चहापानाच्या टपरी जवळ आलो हे आम्हाला खरच वाटत नव्हतं.म्हंटल ह्या रिक्षावाल्याला ठरल्या पेक्षा जरा जास्त पैसे देऊ रिक्षातून उतरल्यावर बाळाला बाबांजवळ दिलं,आतापर्यंत छातीशी  दडवून ठेवलेल्या पैशाच्या पाकिटातून पैसे काढले आणी त्याला द्यायला गेले तर अरेच्या हा एका मिनिटात गेला तरी कुठे ,सगळीकडे शोधक नजर टाकली कुणीच नव्हतं ,अंगावर एक शहारा आला घाबरतच टपरीवर विचारलं की "भैया वो रिक्षावाला  कहा गया हमे उसके पैसे देने है अजीब है पैसे की भी फिकर नही."त्यावर टपरीवाला म्हणाला दीदी मै कई सालो से ये टपरी चला रहा हू और मै आपको विश्वास दिलाता हू की इस रास्तेपर आजतक किसीने कोई रिक्षा नही देखा.इतनी रात को यहासे कोई जाता भी नही ये वोही रास्ता है जिसके बारेमे आयेदिन अखबार में स्त्रीयोसे छेडछाड और खून की खबरे छ्पती रहती है .मी नकळत माझ्या पतीचा हात घट्ट धरला एक थंड शहारा पुन्हा शरीरभर पसरला .एवढ्यात काशीकडे जाणारी शेवटची बस आली आम्ही घाई घाईने आत चढलो चालक अन वाहक ह्यांच्या शिवाय बस मध्ये कुणीच नव्हतं.टपरीवाल्याचा आवाज खूप दुरून कानात घुमत होता "आपलोग बहोत भाग्यवान हो जो काशी विश्वनाथ ने आपको दर्शन दिये और इस भयंकर सडक पर आपकी रक्षा की!"
                                                                सौ.उषा.

Wednesday, 19 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री शेवटी एकदाचे आम्ही त्या दिदिंकडे येऊन पोचलो.रिक्षावाल्याला मोठ्या अज...
                                                                 श्री 
शेवटी एकदाचे आम्ही त्या दिदिंकडे येऊन पोचलो.रिक्षावाल्याला मोठ्या अजीजीने थांबण्याबद्दल विनविले कारण वाटेत कुठेही मनुष्य वस्तीच्या खुणा दिसल्या नव्हत्या .आम्ही कुठल्यातरी अनोळखी ग्रहावर आलो आहे की काय असे वाटण्या इतपत भेसूर शांतता सगळीकडे पसरली होती.रिक्षावाला पुन्हा मानेनेच हो म्हणाला,आम्ही दीदींच्या घराची घंटा वाजविली.एक कुजबुज केल्या सारख्या आवाजात विचारणा झाली कौन है ? मी उषा उत्तर दिल्यावर थोड्यावेळ शांतता मग दीदींचा आवाज आला कौन है ? दीदी मैं उषा हुं.थोडा अविश्वास आणी पुष्कळ भीती असा त्यांचा चेहेरा किलकिल्या दारातून डोकावला,मला दारात बघून आश्चर्य आनंद यांनी त्यांचा चेहरा उजळून निघाला.आम्हाला आत घेऊन त्यांनी दार बंद करून घेतले.मला म्हणाल्या तुम सचमुच आवोगी ये मैने सोचा नाही था,पर उषा तुम याहांतक आई कैसे ?
                                                                  सौ.उषा.
 

Tuesday, 18 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री काशी दर्शन आटपून आम्ही परत आलो तेव्हा संध्याकाळचा अंधार ...

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री काशी दर्शन आटपून आम्ही परत आलो तेव्हा संध्याकाळचा अंधार ...
                                                                               श्री
काशी दर्शन आटपून आम्ही परत आलो तेव्हा संध्याकाळचा अंधार दाटून आला होता पण त्या दिदिंकडे जाण्याशिवाय पर्याय पण नव्हता,मामाला कळवू म्हटले तर त्याचा फोन नंबर असूनही जागोजागी फोन करता येतील अशी काहीही व्यवस्था नव्हती.दिवसभराच्या बस प्रवासाने आम्ही तिघही खरतर कंटाळून गेलो होतो पण ticketच्या पैशावर सहज पाणी सोडावे अशीही आमची परिस्थिती नव्हती.पुन्हा बस मध्ये बसलो अंदाजे दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही उतरलो ती जागा अजिबात आकर्षक नव्हती.रातकिड्यांचे आवाज, मिणमिणत्या उजेडात एक छोटीशी चहापानाची टपरी.इकडे तिकडे नजर टाकल्यावर दूरवर एक सायकलरिक्षा उभा दिसला.आमच्या जवळचा पत्ता त्याला सांगितल्यावर त्याने मानेनेच रिक्षात बसायची खूण केली.फक्त रिक्षाच जाऊ शकेल एव्हढी  जागा अन दुतर्फा उंच वाढलेली उसाची शेतं ,वर आकशात पौर्णिमेचा चंद्र लाखो चांदण्यांना घेऊन अमृत प्रकाशाची मुक्त उधळण करत होता हाच काय तो जिवंतपणाचा अन आमचा संबध बाकी सगळाच प्रकार हिंदी भयपटात असतो तसा प्रकार.रिक्षाला लावलेया घुंगरांचा  आवाज त्या निर्मनुष्य जागेत अजिबात आनंद देत नव्हता. रात्रीचा गारठा वाढत चाललेला ,हळूहळू आम्हाला त्या चांदण्याची सुद्धा भीती वाटू लागली.आम्ही केव्हा मनातल्या मनात रामरक्षा म्हणू लागलो ते आम्हालाही कळले नाही.आम्हाला खूप बोलायचे असून एकही शब्द बोलता येत नव्हता इतकी विचित्र शांतता सगळ्या परिसरात होती.

                                                                सौ.उषा.
                                                                         
                     

Monday, 17 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री आम्हा सर्व हिंदूंना जी यात्रा आयुष्यात एकदातरी घडावी अशी काशीयात्रा मला चक्क तीन...
                                                     श्री 
आम्हा सर्व हिंदूंना जी यात्रा  आयुष्यात एकदातरी घडावी अशी काशीयात्रा मला चक्क तीनदा घडली ही माझ्यावर देवाची विशेष कृपा असं मी तरी मानते. काशीला माझा मामा रेल्वेत deputation वर गेला होता त्यामुळे राहण्याची व्यवस्था उत्तम होती.माझे पति आणी दोन महिन्यांची माझी मुलगी असे आम्हीं काशीला गेलो होतो.गेल्या गेल्या मामानी मला बजावलं तू कुठेही जा पण सातच्या आत घरात दिसली पाहिजे.इथे सध्या तरुण मुलींचे दागिने हिसकावून त्यांना भ्रष्ट करून त्यांच्या बरोबरच्या पुरुषाला ठार मारून टाकले अश्या बऱ्याच घटना एवढ्यात घडल्या आहेत .मी काशीला telephone exchange  ला माझ्या एका वरिष्ठांना भेटायला गेले,त्यांनी त्यांच्या घरी येण्याचा खूप आग्रह केला मी नाही म्हणते आहे बघितल्यावर त्यांनी माझे परतीचे ticketच काढून घेतले आणी ते त्यांच्या घरी गेल्यावर मिळेल असेही सांगितले.बर आता उद्या भेटूया तुम्हालाही तुमची कामं असतील न ! 
                                                                                  सौ.उषा.

Sunday, 16 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री नरेंद्र दत्त म्हणजे आपले स्वामी विवेकानंद त्यांच्या लहानपणी पूर्ण नास्तिक होते.त्यां...
                                                  श्री 
नरेंद्र दत्त म्हणजे आपले स्वामी विवेकानंद त्यांच्या लहानपणी पूर्ण नास्तिक होते.त्यांची आई शिव भक्त आणी खूप अन्नदान करणारी होती त्यामुळे त्यांच्या दारावर कायमच साधू संन्यासी यायचे, त्या प्रत्येकाला लहानगा नरेन विचारायचा तुम्ही देव पहिला आहे? त्यावर त्यांचे नकारार्थी उत्तर ऐकून नरेनला खूप राग यायचा तो म्हणायचा की जो देव तुम्ही पहिला नाही त्याच्या विषयी बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. खूप वर्षांनी तरुण नरेनला असा एक अधिकारी पुरुष भेटला ज्याच्या उत्तराने नरेंद्रच्या आयुष्यातली सगळी समीकरणेच बदलून गेली.रामकृष्ण परमहंस त्याला म्हणाले की मी देव बघितला आहे,तो माझ्याशी रोज बोलतो एवढेच नाही तर मी तुला सुद्धा देव दाखवू शकतो.असे परिपूर्ण उत्तर ऐकल्यावर नरेंद्र अगदी हरखून गेला,पुढे त्याने खूप मोठे कार्य केले जे आपल्या सगळ्यांनाच  माहिती आहे.पण हा देव मी पहिला असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमचा माझ्यावर निश्चितच विश्वास बसणार नाही.असो मी उद्या तुम्हाला ती हकीकत सांगीन. आज एवढच पुरे  .                                                            सौ.उषा.

Thursday, 6 October 2011

USHA:                                                 श्...

USHA: श्...: श्री नवरात्र संपलं आज विजयादशमी !पराक्रमाची पूजा करायची हे आम्हाला लहापणापासून शिकविले जाते...
                                                श्री 
नवरात्र संपलं आज विजयादशमी !पराक्रमाची पूजा करायची हे आम्हाला लहापणापासून शिकविले जाते.राम कृष्ण शिवाजी राणा प्रताप झाशीची राणी अहो किती नावे घेणार ह्या सगळ्यांच्याच गोष्टी आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आणी म्हणूनच काहीही नातं नसताना आम्ही सचिनच्या शतकाने आनंदित होतो,त्याला भारतरत्न मिळावं म्हणून अभियान चालवतो,अमिताभ अजूनही तरुणांना मागे टाकून आघाडीवर असल्याचे आम्हाला कौतुक वाटते.पराक्रम करण्याकरता प्रत्येक वेळेस युद्धभूमीच हवी असं काहीही नाही.ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्याच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करायला भरपूर वाव आहे हे लक्षात ठेवले की आपल्या कामगिरीची सीमारेषा संकुचित राहणार नाही.विजयलक्ष्मी हेही देवीच एक रूप आहे तिच्या चरणी माझे हे पुष्प.

Wednesday, 5 October 2011

USHA: USHA:                                             ...

USHA: USHA: ...: USHA: ... : ...
                                                                   श्री 
आज नवमीची पूजा आपण केली.सर्व असुरांचा संहार करण्याकरता ज्या  कमळात राहणाऱ्या महालक्ष्मीने दुर्गावतार धारण केला.त्या महालक्ष्मीची आज पूजा !स्त्री ही फक्त अलंकार लेऊन मिरवणारी नसते तर प्रसंगी ती रौद्र अवतार पण घेऊ शकते हेच या कथेतून कळते..मुळात स्त्रीला देवाने कोमलांगी,मृदू स्वभावाची ,हळवी अशीच घडविली आहे.मुलांना सांभाळताना ह्या गुणांचा फार उपयोग होतो,घर सावरायला पण या गुणांची गरज आहे.पण हेच गुण तिचे weak point समजून जर कुणी गैर वागायला लागला तर त्याला धडा शिकवायला ती कमी करत नाही.तिला महालक्ष्मीच राहू देणे समाजाच्या हिताचे आहे.तिची मनोभावे प्रार्थना करू या "सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते".महालक्ष्मीच्या चरणी माझे हे पुष्प!
                                                                           सौ.उषा.

Tuesday, 4 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री आपल्याला आपल्या आयुष्यात रोज फक्त आणि फक्त सुख आनंद यश क...

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री आपल्याला आपल्या आयुष्यात रोज फक्त आणि फक्त सुख आनंद यश क...
                                                                              श्री
आपल्याला आपल्या आयुष्यात रोज फक्त आणि फक्त सुख आनंद यश कीर्ती हेच हवं असतं.अपरिहार्यपणे येणाऱ्या दुक्खाची अपयशाची चिंतेची भीतीची आपण काहीच मानसिक तयारी केलेली नसते.आपल्या भोवतालची अनेक माणसं मरताना आपण बघतो पण आपण आपल्या मृत्यूबद्दल विचार करायचं सुद्धा टाळतो.ह्याचाच आज आपण विचार करू या.देवांवर संकट आलं अमृत पिऊनहि अमर न झालेल्या देवांची दया येऊन जगदंबेनी असुरांना मारण्याकरता अत्यंत उग्र रूप धारण केलं काळा रंग अंगावर व्याघ्रचर्म संतापाने लाल झालेले डोळे आणी राक्षसांच रक्त पिण्याकरता आसुसलेली लाल जीभ!एखादा भित्रा जीव तर नुस्त वर्णन ऐकूनच बेशुद्ध व्हायचा.पण ज्याला जी भाषा कळते त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं हा संदेश ही महाकाली देते आहे.उगीचच अहिंसा सत्य अशी पोपटपंची नको.ही शूरांची शस्त्र आहेत आणी त्यांनाच ती शोभून दिसतात .येणाऱ्या संकटांना भिऊन पळ काढण्यापेक्षा त्यांचा सामना करा असं ही देवी आम्हाला सांगते आहे.त्या असुरांना भीती उत्पन्न करणाऱ्या महाकालीच्या चरणी माझे हे पुष्प.
                                                                                                                                                   सौ.उषा.

 

Monday, 3 October 2011

                                                                 श्री 
आज श्री महासरस्वतीची पूजा !साहित्य संगीत नृत्य चित्रकला किती नावं घेणार थोडक्यात म्हणजे सर्वच क्षेत्रातल्या माणसांनी या देवीची उपासना केली पाहिजे.सर्व विद्धयांची अधिष्ठात्री ही देवी सरस्वती भक्तांना सहज प्रसन्न होते.वीणावादिनी   वर दे म्हणून भक्तांनी फक्त हाक मारायचा अवकाश ही देवी साक्षात दर्शन देते.भगवतीच हे सगळ्यात सौम्य आणी विलोभनीय रूप आहे.शुभ्र वस्त्रा शुभ्र फुलांनी प्रसन्न होणारी ही शारदा प्रगट होते ती निरनिराळ्या कलांच्या आनंददायी अविष्कारानी.सर्व कलाकार जिच्या कृपेची अभिलाषा धरतात अश्या या शारदेला आपण पण विनवुया "नव गति नव लय ताल छंद नव नवल कंठ नव जलद मंद्र रव नव नभ के नव विहग वृंद को नव पर नव स्वर दे वीणावादिनी वर दे" ! देवी सरस्वतीच्या चरणी माझे हे पुष्प अर्पण.

Sunday, 2 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री या देवी सर्व भूतेषु क्षुधा,रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये ...

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री या देवी सर्व भूतेषु क्षुधा,रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये ...
                                                                       श्री 
या देवी सर्व भूतेषु क्षुधा,रूपेण  संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः सर्व जीव मात्रांच्या ठिकाणी भूक तहान निद्रा या भावनांची तीव्रता एकसारखीच असते.त्यांच्या या गरजा सारख्याच असतात हे लक्षात घेऊन आपण आपल्या आवाक्यात असणारी मदत जर देऊ केली तर ती जगन्माता आपल्यावर निश्चितच प्रसन्न होईल यात संशय नाही.पण मनुष्य जन्म घेतल्यावर आपण याही पलीकडे जाऊन विचार करावा असं शंकराचार्यांना वाटतं.ते त्यांच्या अन्नपूर्णा स्तोत्रात जगदंबेला काय मागतात ते बघण्या सारखे आहे.ते म्हणतात 
"अन्नपूर्णे सदा पुर्णे शंकरप्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्द्यर्थम   भिक्षां देहि च पार्वती".ज्ञान वैराग्य हे मनुष्य जन्माचे अंतिम उद्दिष्ट आहे पण आमचा सर्व वेळ निरर्थक गोष्टींमध्ये जातो.फारच कमी लोक ह्या अंतिम ध्येया पर्यंत जाऊन पोचतात.शेवटच्या घटके पावेतो आम्हाला या सगळ्यात गुंतून पडायला फार आवडते.जबजागो तब सबेरा अशी हिंदीत म्हण आहे.आपण पण अन्नपूर्णेला म्हणूया ज्ञान वैराग्य सिद्द्यर्थम भिक्षां देहि च पार्वती.                                                          
                                                                     सौ.उषा.

Saturday, 1 October 2011

USHA:                                                   ...

USHA: ...: श्री आज ललिता पंचमीची पूजा बऱ्याच लोकांकडे असते.देवीला दुधाचा,पंचाम...
                                                                        श्री 
आज ललिता पंचमीची पूजा बऱ्याच लोकांकडे असते.देवीला दुधाचा,पंचामृताचा ,कुंकवाचा अभिषेक असे बहुदा पूजेचे स्वरूप असते.श्रीसूक्त नवरात्रात आजकाल बहुतेक सगळेच म्हणतात.आपली स्तोत्र जर आपण लक्षपूर्वक म्हंटली तर आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी,समाजाला एकत्र बांधून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न हे सगळेच आपल्याला त्यात गुंफलेले आढळते.जाज्वल्य देशप्रेम सुद्धा आमची स्तोत्र आमच्याही नकळत आम्हाला शिकवितात.श्रीसूक्तात स्वतःकरता धनदौलत मागताना प्रार्थना असते "प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मीन कीर्ती मृद्धीददातुमे". ज्या राष्ट्रात मी उत्पन्न झालो त्या राष्ट्रात मला यश ,ऐश्वर्यं,समृद्धी तू प्रदान कर .किती सुंदर अर्थ आणी किती सुंदर मागणी.माझ्यावर यश ऐश्वर्य मिळविण्याकरता माझी मातृभूमी सोडायची वेळ येऊ नये.त्याच बरोबर मला मिळणाऱ्या यशावर समृद्धीवर माझ्याच देशबांधवांचा अधिकार असावा ही गर्भित मागणी .आजच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्व ह्या श्रीसूक्ताचे पठण करून यशस्वी आणी समृद्ध होऊ या.श्री ललिता देवीच्या चरणी माझे हे पुष्प.                            
                                                                                                                                       सौ.उषा.